माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निंलगेकर यांचे निधन.
लातूर:-शिवाजीराव पाटील निंलगेकर यांच्या जन्म ९ फ्रेबुवारी १९३१ रोजी निंलगा येथे झाला.ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वतंत्रसैनिक होते. एम.ए.एल.एल.बी.पर्यत त्यांचे शिक्षण झाले होते."दादासाहेब "या नावाने ते सुपरिचित होते. त्यांनी मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रिपदे सांभाळली.त्यामुळे ३जून १९८५ ते ६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले.मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्यासाठी ४२ कलमी,विदर्भासाठी ३३ कलमी आणि कोकणासाठी ४० कलमी विकासाच्या कार्यक्रम घोषित केले. तसेच पहिले ते बारावीपर्यत मुलिंना मोफत शिक्षण, स्वतंत्र सैनिकांच्या मानधनात वाढ,तालुका पातळीवर एमआयडीसी स्थापन करण्याची योजना,पर्यावरण विभागाची निर्मिती, औंरगाबाद खंडपीठाची मंजुरी व बांधकाम असे अनेक निर्णय घेतले. कोरोना सारख्या महाभंयकर आजारावर त्यांनी वयाच्या नव्वदीत ही मोठ्या जिद्दीने मात केली होती. मात्र दुर्दैवाने त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळें त्यांची प्राणज्योत पुणे येथील खाजगी रूग्णालयात मालवली. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी ९७६६४२७०५२.Ajanta Hospital ,Aurangabad Contact:7218869700

Comments
Post a Comment